-->

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उद्या शिवसेना उ.बा.ठा.चे डफडे आंदोलन

0

 शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उद्या शिवसेना (उ.बा.ठा.) चे डफडे आंदोलन

सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी वणी तहसीलवर धडकणार सेनेच भगव वादळ......


वणी :-  तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक असुन, यवतमाळ जिल्ह्यातील भीषण अतिवृष्टी, वारंवार होत असलेली पिकांची नासधूस आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या गंभीर प्रश्नांकडे महायुती सरकारने यवतमाळजिल्ह्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे. सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी २३ सप्टेंबर मंगळवार ला खासदार संजय देशमुख, आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात डफडे आंदोलन करण्यात येणार आहे.  या डफडे आंदोलनात तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Shiv Sena U.B.A.T.A.'s Dafde agitation tomorrow for farmers' rights

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उद्या शिवसेना उ.बा.ठा.चे डफडे आंदोलन

सद्यस्थितीत राज्य व केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी डबघाईला आला आहे.  केंद्र सरकारने कापूस,सोयाबीन या पिकावरील आयात शुल्क हटविल्याने शेतमालाचे भाव पडणार असल्याची लक्षणे दिसून येत आहे.  तर दुसरीकडे वरुणराजा जणू कोपला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.  शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यत पोहचविण्यासाठी व शासनाला जाब विचारण्यासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष 23 सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी एक वाजता वणी तहसील कार्यालयावर धडक देत डफडे आंदोलन करणार आहे. आंदोलनात यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, शेतकऱ्यांना सरसकट अनुदान जाहिर करावे व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या महत्वपूर्ण मागण्याचा समावेश आहे.
    शिवसेना जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनामुळे महायुती सरकारची खोटी आश्वासने आणि निष्क्रियता उघडकीस येणार आहे. तरी महायुती सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी वणी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या आंदोलना करीता एकत्रित यावे असे आवाहन शिवसेना(उ.बा.ठा.) पक्षाने केले आहे.


 डफडे आंदोलन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठीच! : संजय निखाडे. जिल्हा प्रमुख शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष


राज्यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत सरकारने जी आर काढला मात्र यवतमाळ जिल्ह्याला त्यातून वगळण्यात आल्याने शिवसेना आक्रमक झाली असुन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हे डफडे आंदोलन उभारले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top