ती आत्महत्या नसून खुनच! वणी पोलिसांनी लावला एक वर्षानंतर छडा.
वणी :-(रवी ढुमणे)- पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजूर (कॉ.) येथील वापर नसलेल्या पडक्या विहिरीत एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. प्रसंगी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता. विहिरीत मृतावस्थेत आढळून आलेल्या सदर व्यक्तीच्या मृत्यूचं रहस्य जवळपास एक वर्षांनी उलगडलं आहे. त्या व्यक्तीने आत्महत्या केली नसून त्याचा गावातीलच तीन जणांनी संगमत करून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. यातच अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी सदर व्यक्तीचा खून करून आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीनही आरोपींना अटक केली आहे. It-was-not-suicide-but-murder!-The-Wani-police-cracked-the-case-after-a-year.
तालुक्यातील राजूर (कॉ.) येथील रहिवाशी असलेल्या नामदेव पोचम्मा शेनूरवार (५०) याचा मागील वर्षी २५ मार्चला धुलीवंदनाच्या दिवशी कोळसा सायडिंग जवळ मस्जिद परिसरात असलेल्या एका पडक्या विहरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. मृतक हा रोजमजुरी करून आपला उदरनिर्वाह करायचा. तो आपल्या आई सोबत राहत होता. त्याची पत्नी व मुले यांच्या पासून विभक्त राहायची. अशातच तो घरून बेपत्ता झाल्याची तक्रार वणी पोलिसांना प्राप्त झाली. नामदेवचा शोध सुरु असतांनाच एका पडक्या विहरीत त्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळून आला. त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने त्यावेळी त्याच्या मृत्यूबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. नामदेव शेनूरवार हा आत्महत्या करू शकतो यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता, तसेच कुटुंबियांचे देखील म्हणणे होते. परंतु तरीही नामदेव शेनूरवार याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा कयास वर्तवून त्यावेळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली व प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला नाही हे तितकेच खरे! केवळ एकच ध्यास असणारा अधिकारी असले की, होणार तसेच?
घटनेच्या काही दिवसांनी आले उधाण.
नामदेव शेनूरवार याच्या मृत्यूला काही दिवस लोटत नाही तोच त्याच परिसरात राहणारे व त्याच्या नाते संबंधात असणारे व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत आपणच त्याचा खून केल्याचे बरळत होते. एवढेच नाही तर ते मृतकाच्या बहिण व जावयासोबत विनाकारण वाद घालून त्यांच्या अंगावर चालून जात होते. त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत होते. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याइतपत त्यांची मजल वाढली होती. "एकाला तर संपविलेच आता तुमचा नंबर आहे" अशी खुली धमकी देत ते स्वतःच आपल्या गुन्ह्याचा डंका पिटत होते. आरोपींच्या नेहमी वाद घालण्याने व खुल्या धमक्या देण्याने भयभीत झालेल्या मृतकाच्या कुटुंबीयांनी नंतर पोलिस स्टेशनला येऊन पोलिसांसमोर त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा पाढाच वाचला. तसेच ते स्वतःच खून केल्याचे बरळत असून आम्हालाही संपविण्याची भाषा करीत असल्याची तक्रार मृतकाच्या बहिणीने पोलिस स्टेशनला नोंदविली होती.
नवीन ठाणेदार येताच लागला छडा.
धमकी देणाऱ्या विरुद्ध कुटुंबीयांनी तक्रार दिली असताना पोलिसांनी आरोपींची स्वतःच खून केल्याची गरड ओकणं व त्यावेळी कबुली देणं गांभीर्याने घेतलं नाही. मात्र खांदेपालट होताच पोलिसांनी मृतदेह आढळल्याच्या जवळपास एक वर्षानंतर व कुटुंबीयांनी तक्रार केल्याच्या अंदाजे सहा ते सात महिन्यानंतर नामदेव शेनूरवार याच्या मारेकऱ्यांना अटक केली आहे. नामदेव शेनूरवार मृत्यू प्रकरणाची फाईल नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार व सहायक पोलिस निरीक्षक निलेश अपसुंडे व सहकाऱ्यांनी उकरून काढत पोलिसांनी नामदेव शेनूरवार याला मृत्यू पश्च्यात न्याय दिला आहे.
अनैतिक संबंधातून घटना घडली?
नामदेव शेनूरवार याचे आरोपी सिद्धार्थ शेनूरवार याच्या आई सोबत अनैतिक संबंध होते. याची कुणकुण सिद्धार्थला लागल्याने त्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत नामदेवचा खून केला. नामदेव शेनूरवार याला आरोपींचे मनसुबे न कळल्याने तो बेसावध होता. अशातच आरोपींनी त्याचा गेम करून त्याची आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न केला. परंतु दारूच्या नशेत त्यांनी गरड ओकणे सुरु केले. आणि खुनाच्या या घटनेचा उलगडा झाला.
असे अनेक गुन्हे प्रलंबीतच,मात्र राजकीय किनार?
रासा बिट मध्ये अशाच घटना घडल्या होत्या. यासंबंधी सूत्रांनी योग्य ती माहिती सुद्धा पुरविली होती. परंतु तत्कालीन ठाणेदार आणि चमू. म्हणजेच! "राजा बोले" तसच काहीसं! मात्र पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी जर पूर्वीच्या घटनांच्या आढावा घेतला तर,वचक बसणार इतकंच खर!
नात्यातीलच आरोपींनी केला नामदेव चा गेम.
नामदेव शेनूरवार याच्या नात्यातच असलेल्या आरोपींनी कट रचून त्याला यमसदनी धाडले. जवळपास एक वर्षानंतर नामदेवची हत्या करणारे सिद्धार्थ मारोती शेनूरवार, दिवाकर शंकर गाडेकर, पिंटू उर्फ प्रविण वामन मेश्राम हे तीनही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांनी पोलिसांना गुन्ह्याची कबुली देखील दिल्याचे सांगण्यात येत आहे. नामदेव शेनूरवार याचा खून करून मृतदेह विहिरीत फेकणाऱ्या तीनही आरोपींवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर एकाला गुन्ह्याचा साक्षीदार बनविल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश अपसुंडे, भानुदास हेपट, बिट जमादार अमोल अरनेवार, अविनाश बनकर,आदी पोलीस करीत आहे.
विशेष! यांनी लावलाय गुन्ह्याचा छडा.
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, यांनी प्रलंबित गुन्हे तपासले असता. त्यांनी त्यांचा पथकाला बोलावून घेतले. व बिट मध्ये कार्यरत असलेल्या अमोल अरनेवार अविनाश बनकर यांच्याकडे जबाबदारी सोपविली. सदर गुन्ह्यात या पोलीस चमुनी गुन्ह्याचा छडा लावला आहे.
मात्र यात उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांची चमू आणि बिट मध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांचे मोठे योगदान आहे.

.jpg)