वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्ष काढणार "शेतकरी न्याय यात्रा"
वणी विधानसभा क्षेत्रात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष लवकरच जनसंवाद यात्रेचे आयोजन करणार आहे. या यात्रेचे नाव "शेतकरी जनसंवाद यात्रा असे असणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या यात्रेचा आरंभ होऊन, हि यात्रा वणी,, मारेगांव, व झरी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर आदिवासी,महिला,युवक यांच्याशी संवाद साधणार आहे. शेतकरी ,सामान्य जनतेच्या समस्या जाणून शासन दरबारी उचलून, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या यात्रेद्वारे , केला जाणार आहे .खासदार प्रतिभाताई धानोरकर माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात ही यात्रा होणार आहे.
आशिष खुलसंगे (अध्यक्ष, झरी तालुका काँग्रेस तथा अध्यक्ष वसंत जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी) हे या यात्रेचे मुख्य संयोजक आहेत. सह संयोजकांमध्ये संध्या बोबडे (महिला जिल्हा) घनश्याम पावडे (तालुकाध्यक्ष वणी) डॉ. महेंद्र लोढा (शहराध्यक्ष वणी), अशोक पांडे (प्रभारी शहराध्यक्ष) मारोती गौरकार(तालुकाध्यक्ष मारेगांव), राहुल वाडेकर (विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेसच्या ई. कार्यकत्यांच्या समावेश आहे.
यात्रेचे स्वरूप
शेतकरी न्याय यात्रेला मारेगांव पासून सुरूवात होणार आहे. पूर्ण मारेगांव तालुक्याचा दौरा केल्यानंतर हि यात्रा इारी तालुक्यात प्रवेश करेल आणि झरी दौरा झाल्यावर, यात्रा वणी तालुक्यात येईल. बाजेचा समारोप वणी येथे होईल. साजेदरम्यान वर दिवशी शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, महिला, युवक यांच्याशी संवाद साधाला जाईल.
०१. सरसकट व १००% शेतकरी कर्जमाफी करावी (तेलंगाना राज्याच्या धरतीवर).
०२. स्वामीनाथन आयोग लागू करावा. शेतमालाला खर्चानुरूप बाजारभाव व हमीभाव मिळावेत व हमीभावाला कायद्याचे रूप मिळावे.
०३. कृषि उपयोगी शेती अवजारांवरील जि.एस.टी संपूर्णपणे रद्द करावी.
०४. वणी विधानसभा क्षेत्रातील पिकविमा व ओल्या दुष्काळापासून वंचित असलेल्या शेतक-यांना तात्काळ मदत जाहिर करावी.
एक कृषि पंपाचे बीज बील संपूर्णतः माफ करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा मिळावा.
०६. वन्य प्राण्यांमुळे होत असलेले शेतीचे नुकसान बघता शेतकऱ्यांना काटेरी तार कंपाऊंड १००% अनुदान मध्ये देण्यात यावे.
०३. तिन्ही तालुक्यांत शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृह सुरू करावे.
७८. वणी व झरी तालुक्यातील ८० टक्के कंपनीत स्थानिकांना रोजगार द्यावा.
०१. मारेगांव व झरी येथे तात्काळ बस स्थानक करावे,
१०. मारेगांव व झरी तालुक्यात क्रिडा संकुलाचे काम त्वरीत सुरू करावे.
११. मारेगांव एम. आय.डि.सीचा प्रश्न तातडीने सोडवावा.
१२. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांवर आळा घालण्यासाठी वणी शहर वेकोली अंतर्गत वणी शहरात शुद्ध पाणी पुरवठा करावा.
१३. वणी मधून मिळणारा कोळसा, सिमेंट, चुना यातून येणारा खनीज विकास निधी, पूर्ण जिल्ह्याकरिता न वापरता वणी विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी वापरावा.
वणी-मुकुटबन रस्ता, नांदेपेरा-मार्डी रस्ता, चारगांव चौकी-शिरपूर कळमना,आबाई फाटा,ढाकोरी बोरी, करोडो रूपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यांची, संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जी आणि बेजबाबणारपणामुळे, एका वर्षात दुरावस्था होऊन, रस्ते पाण्याखाली गेले. ह्याची चौकशी करून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे व उच्चस्तरीय चौकशी व्हावी.
११. वणी शहरातील अविकसीत वस्त्यांमध्ये विकास कामे व्हावीत.
१५. वणी विधानसभा क्षेत्रात उपजिल्हा रूग्णालयाचे काम तातडीने सुरू करावे
१७. वणी शहरात करोडो रूपये खर्च करून, बांधलेले सांस्कृतिक भवन जनतेसाठी खुले करावे.
१८. आदिवासी बांधवांना त्यांचा 'वन हक्क' मिळावा आणि २०२५ नंतरच्या शेती करणान्या आदिवासींना वन जमीन पट्टे देण्यात यावी.
१९. वणी विधानसभा क्षेत्रात लाखो रूपये खर्च करून केलेल्या निकृष्ट रस्त्याच्या कामांची चौकशी कावी
२०. गावागावांत बंद असलेल्या वॉटर फिल्टर प्लांटची चौकशी व्हावी.
२१. शहर व गावांतील प्रदूषणावर तोडगा काढावा.
२२. ए.एन.एम व जी.एन.एम यांना वाढती महागाई बधता पगारवाढ करण्यात यावी.
२३. पोलिस पाटलांचे रखडलेले वेतन त्वरीत देण्यात यावेत.
२४. कंत्राटी कर्मचान्यांचे रखडलेले मानधन त्वरीत देण्यात यावे व शासकीय काम करीत असल्यास पर्मनन्ट करावे.
आदी मागण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक वसंत जिनिंग हॉल मध्ये पत्र परिषद घेत शासनाच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.

.jpeg)