-->

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी ठाकरेंची शिवसेना तहसिलवर धडकणार

0

 शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी ठाकरेंची शिवसेना तहसिलवर धडकणार

एकत्रित होण्यासाठी आमदारांचे शेतकऱ्यांना आवाहन

वणी:-  अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मंत्रांचा ताफा अडवून सवाल उपस्थित करणाऱ्या शिवसैनिकांना अजामीनपात्र गुन्ह्यात अडकविणारे सरकार व शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी, ७ ऑक्टोबर मंगळवारी सकाळी ११ वाजता सर्व शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय परिसरात येण्याचे आवाहन आमदार संजय देरकर यांनी केले आहे. Thackeray's Shiv Sena will attack the tehsil for the justice rights of farmers

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी ठाकरेंची शिवसेना तहसिलवर धडकणार

     अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन,फळबागा पुरत्या उध्वस्त झाल्या आहे.  मात्र सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याऐवजी केवळ शब्दांचा खेळ करीत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची जणू थट्टाच करीत आहे.  विविध प्रकारे कर्ज काढून शेतात पीक उभे केले परंतु अतिवृष्टीमुळे ते सुद्धा हिरावून घेतले.  एकीकडे डोक्यावर कर्जाचा डोंगर तर दुसरीकडे सरकारचे वेळकाढू धोरण यात बळीराजा पुरता अडकला आहे. असे असतांना सरकार नियम, अटी, निकष यातच खेळ करीत आहे.  सर्वदूर अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्धवस्त झाला तरी असंवेदनशील सरकारने दिलेला शब्द फिरवला.  'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा,कोरा करू' अशा घोषणा देणारे मुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहे.  एकीकडे अस्मानी तर दुसरीकडे सुल्तानी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.  सर्व शेतकऱ्यांनी आज ७ ऑक्टोबर मंगळवारला सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय परिसरात येण्याचे आवाहन आमदार संजय देरकर यांनी केले आहे.

आवाहन-

वणी शहरात शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी शिवसैनिक रस्त्यावर...!


अतिवृष्टीने बळीराजा उध्वस्त झाला, पण सरकार मूक आहे! शेतकऱ्यांचा आवाज ऐकण्याऐवजी मंत्री अशोक उईके गाडीतून उतरायलाही तयार नाहीत सत्ता डोक्यात गेली की माणुसकी संपते !


या हुकूमशाही सरकारने १३ शेतकरी समर्थक शिवसैनिकांना अजामीनपात्र गुन्ह्यांत अटक करुन आतमध्ये डांबले आहे! महाराष्ट्रात आजपर्यंत असा अन्याय कधीच पाहायला मिळाला नाही! शेतकऱ्याच्या बाजूने बोलणं जर गुन्हा असेल - तर हे सरकार शेतकरीविरोधी आणि दडपशाही करणारी सत्ता आहे!

     आज दिनांक ७ ऑक्टोबर ला सकाळी ११ वाजता, तहसील कार्यालय वणी येथे सर्व शेतकरी बांधवांनी हजर राहावे !

मागण्या:-

    शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत तात्काळ द्यावी! सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ जाहीर करावी! १३ शिवसैनिकांवरील खोटे गुन्हे तुरुंगात टाकण्याऐवजी त्वरित मागे घ्यावेत!
ही लढाई बळीराजाच्या न्यायाची आहे, आणि हा आवाज कुणीही दाबू शकत नाही.
संजय नि. देरकर
आमदार वणी विधानसभा, (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), संपर्क प्रमुख चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top